राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागात सन २०२४-२५ या वर्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल ११३ जणांना ही पदोन्नती देण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होणार आहे. या पदोन्नतीमुळे विभागातील कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पडेल, तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे.

विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, अधिकारी वर्गातील ८ जणांना पदोन्नती मिळाली आहे. यात विभागीय वाहतूक अधिकारी १, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) १, सुरक्षा निरीक्षक १, राखण व पहारा निरीक्षक १ आणि सहायक वाहतूक अधिकारी ४ यांचा समावेश आहे. या पदोन्नतींनी अधिकारी वर्गाच्या संघटनात्मक शक्तीमध्ये महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
कर्मचारी वर्गात एकूण १०५ जणांना पदोन्नती मिळाली आहे. यात वाहतूक निरीक्षक ६, सहायक वाहतूक निरीक्षक १२, वरिष्ठ लिपिक २१, प्रमुख कारकून ८, कारागिर ‘क’ ३९ आणि सहायक कारागिर १९ यांचा समावेश आहे. यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
पदोन्नतीमुळे कर्मचारी वर्गातील मनोबल वाढेल आणि कामकाजात सुधारणा होईल, असा विश्वास विभागीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यंदा अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आल्याने विभागाच्या संघटनात्मक ताकदीत भर पडली असून कामकाज अधिक सुसंगत होणार आहे.
तांत्रिक बाबींमुळे रखडलेल्या ४० पदोन्नतीच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. प्रशासनाने सांगितले की, तांत्रिक बाब दूर होताच उर्वरित कर्मचाऱ्यांचा पदोन्नती मार्ग मोकळा होईल. यामुळे पुढील काळात अजूनही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळेल.
पुणे एसटी विभागाचे नियंञक अरुण सिया यांनी स्पष्ट केले की, एकूण ११३ जणांना ही पदोन्नती मिळाली असून त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विभागीय कामकाज अधिक कार्यक्षम होईल आणि कर्मचारी वर्गात समाधान निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
यंदा कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखो कोकणवासीय पुणे जिल्ह्यातून गावी जात आहेत. नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विभागाने २३० एसटी बस कोकणात पाठवल्या आहेत. प्रवाशांनी महिनाभरापूर्वीच बसांसाठी आरक्षण केले आहे.
कोकणवासीयांसाठी ही सोय विभागाने वेळेत केली असून, प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी बस सेवा पुरवली जाईल. गणेशोत्सवाच्या काळात एसटी बस सेवांच्या व्यवस्थापनामुळे प्रवाशांना त्रास न होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments are closed.