नवोदय विद्यालय सहावी प्रवेश २०२५-२६ सुरू! – अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै; जिल्ह्यानुसारच प्रवेश, पात्रता, परीक्षा तपशील जाणून घ्या! | Navodaya Class 6 Admission Open, Apply by July 29!

Navodaya Class 6 Admission Open, Apply by July 29!

0

महाराष्ट्रातील हजारो पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी आली आहे. जवाहर नवोदय विद्यालय समितीनं शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रियेचा आरंभ केला असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २९ जुलै २०२५ आहे. या शाळांमध्ये दर्जेदार आणि मोफत शिक्षण दिलं जातं आणि ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे.

Navodaya Class 6 Admission Open, Apply by July 29!

प्रवेशासाठी कोण पात्र?
या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी १ मे २०१४ ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत जन्मलेला असावा. त्याचप्रमाणे, त्याने पाचवी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी आणि तो ज्या जिल्ह्यातील शाळेतून पाचवी उत्तीर्ण झाला आहे, त्याच जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करू शकतो. विद्यार्थ्याचे वय अर्जाच्या तारखेस १० ते १२ वर्षांदरम्यान असावे.

प्रवेश अर्ज कसा करावा?
इच्छुक पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करताना पासपोर्ट आकाराचा फोटो, विद्यार्थीची स्वाक्षरी, आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र व पाचवीच्या उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

प्रवेश परीक्षा कधी होणार?
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार आहे – पहिला टप्पा १३ डिसेंबर २०२५ रोजी, तर दुसरा टप्पा ११ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी या तारखांची नोंद करून वेळीच तयारी करावी. ही परीक्षा एकूण १०० गुणांची असून कालावधी २ तासांचा असेल.

परीक्षेचा स्वरूप कसे असणार?
परीक्षेमध्ये अंकगणित, भाषा आणि मानसिक क्षमता या तीन विषयांवर आधारित प्रश्न असतील. या परीक्षेसाठी नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. विशेष म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना ४० मिनिटांची अतिरिक्त वेळ दिली जाणार आहे.

प्रत्येक नवोदय शाळेत किती जागा?
प्रत्येक नवोदय विद्यालयात ८० विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे स्पर्धा तीव्र असली, तरी सर्व जिल्ह्यांना संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी तयारीला लागावं. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही संधी अत्यंत मौल्यवान आहे.

एनव्हीएसचा उद्देश आणि दर्जा
जवाहर नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेले रेझिडेन्शियल स्कूल्स आहेत. येथे विद्यार्थ्यांना निवास, भोजन, पुस्तकं, वसतिगृह, शिक्षण सर्व मोफत दिलं जातं. ग्रामीण व मध्यमवर्गीय पालकांसाठी हा शिक्षणाचा हक्काचा पर्याय आहे.

लवकर अर्ज करा, संधी सोडू नका!
नवोदय प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी एकदाच होते. त्यामुळे पात्रता असलेल्या मुलांना वेळेत अर्ज करून तयारी सुरू ठेवावी. ही परीक्षा म्हणजे केवळ एका शाळेत प्रवेश नव्हे, तर एक दर्जेदार भविष्यासाठी उघडणारे दार आहे.

Leave A Reply