Maharashtra Weather Update – पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Update

0

Maharashtra Mansoon Update

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की मान्सूनच्या पोषक हवामानामुळे, 10 ते 14 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचणार आहे.

राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत होते. काल राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मान्सून सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, आणि सोलापूरमध्येही पोहोचला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते, 10 ते 14 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यात पोहोचेल. पुढील चार दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

10 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर आला आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मान्सून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोहोचला आहे. तसेच, महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशाच्या काही भागांतही मान्सून प्रगती करत आहे. अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागातही मान्सून पोहोचला आहे. गुरुवारी मान्सूनची सीमा रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम आणि इस्लामपूर (प. बंगाल) येथे होती.


हवामानाचा अंदाज काय सांगतो? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

अवकाळीचे संकट! विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

दरम्यान, विदर्भातही हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, फक्त पावसाचाच नाही तर वादळाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी इतका असेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

मुंबईबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई आणि तिच्या उपनगरातील वातावरण पुढील २४ तास ढगाळ राहील आणि संध्याकाळी मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की खूप उष्णता असेल.

दरम्यान, मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) बंगालच्या उपसागरात एक शक्तिशाली चक्रीवादळ तयार होत असल्याचा इशारा दिला आहे. ज्याचा परिणाम येत्या काही दिवसांत देशातील अनेक राज्यांवर होऊ शकतो. हवामान खात्याच्या मते, हे वादळ २३ मे ते २७ मे दरम्यान किनारपट्टी राज्यांना धडकण्याची शक्यता आहे.


नैऋत्य मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल, 18-25 जूनपर्यंत उत्तर प्रदेशात पोहोचण्याची शक्यता

Weather Update News : देशात लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. यंदा नैऋत्य मान्सून ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणतात की ते लवकर नाही. हे सामान्य तारखेच्या जवळ आहे. मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये पोहोचतो

Monsoon Update: मान्सून 19 मे रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो हळूहळू देशाच्या इतर भागांकडे सरकेल.
सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटा सुरू आहेत. कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, एक आनंदाची बातमी आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारताच्या हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे की दक्षिण पश्चिम मान्सून 31 रोजी केरळमध्ये पोहोचेल IMD च्या अंदाजानुसार, मान्सून 19 मे रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून हळूहळू देशाच्या इतर भागांकडे जाईल. . मान्सून साधारणपणे उत्तरेकडे सरकतो आणि 15 जुलैपर्यंत देशाच्या मोठ्या भागात पोहोचतो.

घोषित तारखेमध्ये 4 दिवस कमी किंवा जास्त दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून येऊ शकतो. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, हे लवकर नाही. हे सामान्य तारखेच्या जवळ आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मान्सून सुरू होतो.

गेल्या वर्षी 8 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते

अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर मान्सूनच्या दोन दिवस आधी 19 मे रोजी तो दाखल होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तिथे दार ठोठावण्याची नेहमीची तारीख 21 मे असते. गेल्या वर्षीही मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर 19 मे रोजी दाखल झाला होता. मात्र तो केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता. IMD च्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखा गेल्या 150 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. 1918 मध्ये, मान्सून पहिल्यांदा केरळमध्ये 11 मे रोजी पोहोचला. 1972 मध्ये, ते 18 जून रोजी केरळमध्ये पोहोचले. गेल्या 4 वर्षांचा विचार केल्यास, मान्सून 2020 मध्ये 1 जून, 2021 मध्ये 3 जून, 2022 मध्ये 29 मे आणि 2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला.

तुमच्या राज्यात मान्सून कधी येणार?

हवामान खात्यानुसार केरळमध्ये 1 ते 3 जून, तामिळनाडूमध्ये 1 ते 5 जून, आंध्र प्रदेशमध्ये 4 ते 11 जून, कर्नाटकमध्ये 3 ते 8 जून, बिहारमध्ये 13 ते 18 जून, झारखंडमध्ये 13 ते 17 जून, पश्चिम बंगाल 7 ते 13 जून छत्तीसगड 13 ते 17 जून 19 ते 30 जून गुजरात 9 ते 16 जून महाराष्ट्रात 5 जून गोवा 11 ते 16 जून ओडिशा 18 ते 25 जून उत्तर प्रदेश 20 जून उत्तराखंड, 28 जून हिमाचल प्रदेश 22 जून, दिल्ली 27 जून, पंजाब 26 जून ते 1 जुलै, हरियाणा 27 जून ते 3 जुलै, चंदीगड 28 जून आणि राजस्थान 25 जून ते 6 जुलै.

कालपासून सूर्याची किरणे उघडली आहेत.

आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये, हवामान खात्याने म्हटले आहे की, पश्चिम उत्तर भारतातील काही भागांत १६ मेपासून आणि १८ मे पूर्वी उष्णतेची लाट दिसून येईल. यासोबतच, २० मेपर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

या राज्यांमध्ये पाऊस अपेक्षित आहे

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 ते 19 मे दरम्यान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. 16 मे रोजी कर्नाटक, 18 मे रोजी तामिळनाडू आणि 19 मे रोजी केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उष्णतेचा इशारा: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा त्रास, आयएमडीचा इशारा, वादळी वाऱ्याची शक्यता


Maharashtra Weather Update: राज्यात सध्या उन्हाळा किंवा पावसाळा असा प्रश्न पडला आहे. राज्यात सध्याच्या हवामानाचा अनुभव मिश्र स्वरूपाचा येत आहे. एका बाजूला अवकाळी पाऊस तर दुसरीकडे जीवघेण्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावरून हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सोलापूर आणि अकोला जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

 

राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते. पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते. पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजेच ७, ८, ९ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोडी, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना वीजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Today’s Forecast for Jacob Circle, Maharashtra

  • Morning 31°

  • Afternoon 32° Chance of Rain1%

  • Evening 30° Chance of Rain5%

  • Overnight 29° Chance of Rain6%

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा पूर्व विदर्भ ते उत्तर तामिळनाडू पर्यंत जात आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजेच ७, ८, ९ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात ९ व ११ मे रोजी विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचे – Marathwada Weather Update

मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच ११ मे पर्यंत मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ७ मे रोजी नांदेड व लातूर जिल्ह्यात तर ८ मे रोजी हिंगोली, नांदेड व लातूरला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कटकडात, मेघ गर्जना व वादळी वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 – Havaman Andaj

६ मे पासून पुढील आठवडाभर म्हणजे सोमवार दि.१३ मे पर्यंत संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड अशा १९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.  उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण तसेच खान्देश नाशिक नगर पुणे सातारा छ.सं.नगर जालना हिंगोली अश्या १७ जिल्ह्यात मात्र वरील वातावरणाची शक्यता नाही. खान्देशसहित संपूर्ण मध्य-महाराष्ट्र, व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे मंगळवार दि.७ मे पर्यन्त रात्रीचा असह्य उकाडा जाणवेल.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा व लगतच्या भागावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे राज्यात काही भाग वगळता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील आजचे वातावरण कसे आहे? – havaman andaj today

उष्णतेची लाट सदृश स्थिती महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ व खान्देश तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अशा २३ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार दि. ९ मे पर्यंत दुपारचे कमाल तापमान भाग बदलत ४० ते ४२ तसेच ४२ ते ४५ डिग्री से. ग्रेड. दरम्यान राहून ह्या ठिकाणी उष्णतेच्या लाट सदृश्य स्थिती जाणवेल, असे वाटते. मागील महिन्यातील आढावा अवकाळीचा गेल्या संपूर्ण एप्रिल महिन्यात विशेषतः महिन्याच्या उत्तर्धातील शेवटच्या काही दिवसातील माध्यमे व इतरांद्वारे अवकाळीबाबत दिल्या गेलेल्या अंदाजातील कथनी आणि प्रत्यक्षातील निसर्गातील घडणी पाहता ऐन रब्बी पीक काढणीच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे इशारे घाबरवणारेच ठरलेत, असे वाटते.

विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

हवानान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला जिल्ह्यात आज तर चंद्रपूर जिल्ह्यात उद्या मेघ गर्जना, विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 9 मे पर्यंत राहणार असून विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड व लातूर जिल्ह्यातही या कालावधीत मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहतील. त्यामुळे या ठिकाणी देखील पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

सोलापूर आणि अकोला हॉट

दरम्यान, राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरु आहे. तापमानाचा पार दिवसेंदिवस वाढत आहे. अशात रविवारी सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या ठिकाणी तापमानाने 44.3 डिग्री सेल्सिअसचा टप्पा पार केला. पुण्याच्या तापमानात देखील रविवारी वाढ दिसून आली या ठिकाणी तापमान 40.3 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.