गुरु कुठं गं भेटणार?-Where Are the Teachers Gone?

Where Are the Teachers Gone?

0

यवतमाळ जिल्हातल गंभीर प्रश्न हाय! जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या तब्बल ७०८ शिक्षकांची जागा रिकामी हाय. पोरं शाळेत जातायत, पण वर्गात शिकवायला गुरूजीच नाहीत. मग पोरगं विचारतोयच – “आई, आमचा गुरु कोण गं?”

Where Are the Teachers Gone?जिल्ह्यात मंजूर असलेल्या ४८७९ पदांपैकी ४१७१ पदांवरच कर्मचारी हायेत. सर्वात जास्त रिक्त पदं ही सहायक शिक्षकांची – बापरे ७०८! त्यामुळे शिक्षणावरच प्रश्नचिन्ह आलंय.

पवित्र पोर्टलवरून मागल्या वर्षी काही जागा भरल्या होत्या, पण अजूनही पुरेसं शिक्षक मिळत नाही. काही ठिकाणी पेसा क्षेत्रात १९५ शिक्षकांना कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेलं. यंदाही तसंच करायचंय म्हणतात.

इतकंच नाही, तर केंद्र प्रमुखांची १७० पदं रिकामी हाय. त्यामुळे काही शिक्षकांनाच जबाबदारी दिलेली. गुरुजी एकाच वेळी वर्गात शिकवतात आणि केंद्र प्रमुखाचं काम करतात. शासन आदेशाची वाट बघतायत, पण तोपर्यंत पोरांचं शिक्षण अर्धवटच!

Leave A Reply