सुपर स्टुडंट स्कॉलरशिप-Top Talent Scholarship

Top Talent Scholarship

0

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची खास शिष्यवृत्ती मिळतेय — वर्षाला १२ हजार रुपये. त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा २१ डिसेंबर रोजी राज्यभर परीक्षा घेण्यात येणार आहे. ही योजना नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश बाळगते.

Top Talent Scholarshipशिष्यवृत्ती साठी अर्ज प्रक्रिया १२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती (एनएमएमएस) पोर्टलवर ऑनलाइन करायचा आहे. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे, तर अनुसूचित जाती-जमातीसाठी ५० टक्के गुण पुरेसे आहेत. पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे, हे बंधन आहे, आणि त्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता आणि शैक्षणिक अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तरीही, विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, वसतिगृहातील सवलत घेणारे किंवा सैनिकी शाळांतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा १,००० रुपये १२ महिन्यांसाठी दिले जातील.

पात्रतेची अटी:

  • राज्यातील कोणतीही सरकारी, सरकारमान्य खासगी अनुदानित शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील आठवीत शिकणारे विद्यार्थी.

  • पालकांचे वार्षिक उत्पन्न ३,५०,००० रुपयांपेक्षा कमी असावे.

  • बौद्धिक क्षमता चाचणी – ९० गुण

  • शालेय क्षमता चाचणी – १० गुण

Leave A Reply

Your email address will not be published.