सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर, यंदा उमेदवारांची नोंदणी प्रचंड वाढली आहे. येत्या रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी दोन्ही पेपर घेण्यात येणार असून, राज्यभरातून तब्बल चार लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी अर्ज केला आहे.

नोंदणी सर्वाधिक पुणे, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यांतून झाली आहे. पुण्यातून ३७,२९३, नाशिकमधून ३२,०३१ आणि नांदेडमधून २६,१३७ उमेदवारांनी टीईटीसाठी नावनोंदणी केली आहे. मुंबई शहरातील तीन विभागांमधून एकूण १२,६५०, तर ठाण्यात १६,९१४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
राज्यातील १,४२० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन पेपरांपैकी, पेपर १ साठी २,०३,३३३ आणि पेपर २ साठी २,७२,३३५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
पेपर १ मधील गणित विषयासाठी १,०१,७९४ तर समाजशास्त्र विषयासाठी १,७०,५४१ उमेदवार बसणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे, ज्यात अहमदनगर (२२,८५०), छत्रपती संभाजीनगर (२४,२००), लातूर (२१,७४४) आणि सोलापूर (२१,३०५) यांचा लक्षणीय सहभाग दिसून येतो.

Comments are closed.