महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रिया गतीमान व्हावी, पारदर्शकतेने व्हावी आणि रिक्त पदे कायमस्वरूपी भरली जावीत, अशा मागण्या पात्र डीएलएड व बीएड धारक उमेदवारांनी पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे केल्या आहेत.
‘टीएआयटी-३’ नंतरची प्रक्रिया सुरू असताना उमेदवारांनी लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले.
त्यांची ठाम मागणी आहे की –
कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षकांच्या ऐवजी कायम नियुक्त्या व्हाव्यात.
निवड झाल्यानंतर पद न स्विकारणाऱ्या उमेदवारांना प्रक्रियेतून वगळावे.
रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी प्रतीक्षा यादी जाहीर करावी.
मुलाखतीत पारदर्शकता राखावी आणि प्रत्येक उमेदवाराला उपस्थितीचा पुरावा द्यावा.
यामुळे शिक्षकांची भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जाही उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.