शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) निकालाची उत्सुकता परीक्षार्थींमध्ये वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर या निकालाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. मात्र, राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की TAIT निकाल १५ ऑगस्टपूर्वी जाहीर होणार आहे. यासाठी परीक्षेचे निकाल एकत्र करून अंतिम निर्णय घेण्यात आला असून लवकरच अधिकृत वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध केला जाईल.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ११ ऑगस्ट रोजी निकालाविषयी अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या पत्रकात निकालाच्या विलंबामागील कारणे आणि निकाल जाहीर होण्याच्या तारखेची माहिती दिली आहे. परीक्षार्थींनी अफवा नाकारून अधिकृत वेबसाईटवरच निकाल पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
TAIT परीक्षा आयबीपीएस या संस्थेमार्फत शासन निर्णयानुसार २१ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा २७ मे ते ३० मे व २ जून ते ५ जून या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३००८ उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला.
शासनाने बीएड, डीएड उत्तीर्ण उमेदवारांना व्यावसायिक अहता किंवा तत्सम वैध प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या एका महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य केले आहे. मात्र, बीए व डीएड परीक्षांचा निकाल वेगवेगळ्या वेळेस येत असल्याने या सर्व माहितीचे संकलन व निकाल लावण्यात विलंब होत आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास थोडा वेळ लागतो आहे.
५ ऑगस्ट रोजी डीएड परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाला असून, त्यानंतर TAIT निकालाची कार्यवाही वेगाने सुरू आहे. निकाला संबंधी अंतिम टप्प्यातील कामकाज सुरू असून, लवकरच तो परीक्षार्थ्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध होईल.
राज्य परीक्षा परिषदेने परीक्षार्थ्यांना अफवा पसरविणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत वेबसाइटवरूनच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षक पात्रतेसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे उमेदवारांनी संयम बाळगून अधिकृत अधिसूचना आणि निकालाच्या प्रतीक्षेत राहावे. राज्य परीक्षा परिषदेने निकाल वेळेवर जाहीर करून परीक्षार्थ्यांचा भविष्यातील कारकीर्दीसाठी योग्य मार्गदर्शन करणार आहे.
या निकालामुळे शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला गती येणार असून, शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यास मदत होणार आहे. परीक्षार्थ्यांनी त्यांच्या भविष्यासाठी ह्या निकालावर लक्ष ठेवावे आणि अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती मिळवावी.

Comments are closed.