राज्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्या कामकाजात आता मोठा बदल होणार आहे. ग्राम महसूल अधिकारी हे थेट जनतेशी संपर्कात असतात, पण आता त्यांच्या दैनंदिन कामावर अधिक पर्यवेक्षण आणि नियोजन केले जाणार आहे, ज्यामुळे कामे अधिक जलद पार पडतील.
मुख्य बदल:
- सर्व ग्राम महसूल अधिकारी आठवड्यात चार दिवस सजेच्या चावडीत आणि एक दिवस मंडळ कार्यालयात उपस्थित राहतील.
- मंडळ अधिकारी हे उपस्थितीवर आणि कामकाजावर कडक पर्यवेक्षण करतील.
- मंडळ कार्यालयात विविध शासकीय योजना मोहिम स्वरूपात राबविल्या जातील.
- केंद्रस्तरीय मंडळ कार्यालयातील कायदेशीर जबाबदारी आणि पर्यवेक्षण मंडळ अधिकारी यांची राहणार आहे.
- नागरीकांना मिळणाऱ्या सुविधांसाठी “आपले सरकार केंद्र” तयार होईल, जिथे ७/१२ नोंदी, पिक विमा, विविध दाखले आणि शासकीय योजना एकाच ठिकाणी मिळतील.
- जिल्हाधिकारी ६ महिन्यांनंतर आढावा घेऊन आवश्यकतेनुसार उपस्थिती आणि कामकाज सुधारणा करू शकतील.
यामुळे नागरिकांना तत्काळ सुविधा मिळतील, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कामकाज परिणामकारक होईल आणि शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळणार आहे.

Comments are closed.