कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेनं मे महिन्यात शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला, पण आता तोच कांदा सडतोय आणि बाजारात दर घसरतोय!
कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत.
एका बाजूला मे महिन्यातल्या पावसामुळे व नंतरच्या दमट हवामानामुळे चाळीतला कांदा सडतोय, तर दुसऱ्या बाजूला बाजारात भाव प्रतिकिलो १२-१५ रुपयांवर आलाय.
शेतकऱ्यांनी एकरी ५०-६० हजार रुपये खर्चून चांगल्या प्रतीचा कांदा घेतला, पण तो खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता सर्वत्र आहे.
बांग्लादेशकडून खरेदी थांबवली, निर्यातही बंद:
बांग्लादेशनं यंदा स्वतः कांद्याचं उत्पादन घेतल्यानं भारतीय कांद्याची खरेदी थांबवलीय. त्यामुळे निर्यातीवर आणि दरावर थेट परिणाम झालाय.
दक्षिण भारतातील स्पर्धा:
कर्नाटक, आंध्र, तमिळनाडूमधून स्थानिक कांद्याची आवक वाढल्यानं नाशिक-नगरच्या बाजारावर ताण आलाय, आणि भाव कोसळलेत.
शेतकऱ्यांची मागणी:
सरकारनं तातडीने हस्तक्षेप करावा, कांदा खरेदी धोरण ठरवावं, हमीभाव जाहीर करावा, नाहीतर मोठं आर्थिक नुकसान अनिवार्य आहे.
शेतकरी प्रदीप काळे म्हणतात:
“कांदा चांगल्या भावात विकण्याच्या आशेनं साठवला होता, पण आता तोच सडतोय. नुकसान टाळायचं असेल तर सरकारनं वेळीच निर्णय घ्यावा!”

Comments are closed.