सध्या तालुक्यात १३३ पदं रिकामं असून, त्यामुळे गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिक वर्गावर कसून कामाचा बोजा पडलाय.
राज्य सरकारनं गेल्या वर्षी पवित्र पोर्टलवरून भरती केली खरी, पण त्यानंतर अनेकजण सेवानिवृत्त झाले, काहींच्या बदल्या झाल्या – त्यामुळे रिक्त पदं भरलीच नाहीत!
तालुक्याचं शिक्षण चित्र:
जि.प. शाळा: 208
विद्यार्थी: 17,185
रिक्त पदं: 133
काय चाललंय शाळांमध्ये? तर एका शिक्षकावर दोन-दोन वर्गांचा भार, मुख्याध्यापकच नाही, काही शिक्षकांनाच केंद्रप्रमुखाची जबाबदारी!
गावकऱ्यांनी काय केलंय?
काहींनी शाळा डिजिटल केल्या
विद्यार्थ्यांची संख्याही वाढतेय
पण शिक्षक नाहीत!
पालकांचा रोष:
“लवकरात लवकर शिक्षक द्या, आमचं लेकरं ढंगानं शिकू देत!”
प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले म्हणतात:
“रिक्त जागांमुळे गावकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लवकर भरती झाली तर दर्जेदार शिक्षण देता येईल.”

Comments are closed.