संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून ‘नमो किसान सन्मान योजने’चा आठवा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या अंतर्गत तब्बल ५८,४८६ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹११.६९ कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी ₹६,००० आणि राज्य सरकारकडून आणखी ₹६,००० असे एकूण ₹१२,००० अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.
या आर्थिक मदतीमुळे शेतीसाठी लागणारा खर्च भागविण्यास शेतकऱ्यांना मदत होत असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. तसेच संकटकाळातही सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार दिल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Comments are closed.