महाराष्ट्रातील परिवहन विभागात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरटीओ विभागाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AIMV) पदांच्या तब्बल ४६१ जागांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
विभागात सध्या मनुष्यबळाची कमतरता असल्याने ही भरती प्रक्रिया राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील परिवहन विभागात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरटीओ विभागाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AIMV) पदांच्या तब्बल ४६१ जागांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. विभागात सध्या मनुष्यबळाची कमतरता असल्याने ही भरती प्रक्रिया राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
परिवहन विभागात सहाय्यक निरीक्षकांची एकूण ११५८ पदे मंजूर असली तरी त्यापैकी केवळ ७८५ पदेच भरलेली आहेत. म्हणजेच जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमुळे ३२८ सहाय्यक निरीक्षकांना उच्च पदांवर बढती मिळाल्याने कनिष्ठ स्तरावर मोठी रिक्तता निर्माण झाली आहे.
ही भरती झाल्यानंतर आरटीओ कार्यालयांमधील कामकाज अधिक वेगाने होईल. वाहन नोंदणी, लायसन्स चाचण्या, वाहन तपासणी यांसारख्या सेवांमध्ये होणारा विलंब कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
नवीन भरती होणाऱ्या निरीक्षकांना ई-चलान प्रणाली आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) यांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यामुळे रस्ते सुरक्षा मोहिमा अधिक प्रभावी होतील आणि वाहतुकीवरील नियंत्रण मजबूत होईल.
आरटीओमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. वाहन नोंदणी, फिटनेस तपासणी, ड्रायव्हिंग टेस्ट घेणे तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे अशा अनेक जबाबदाऱ्या या पदावर असतात.

Comments are closed.