लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेत eKYC (केवायसी) करणे अनिवार्य केले असून, eKYC न केल्यास पुढील हप्ता मिळणार नाही. मात्र, अनेक महिलांनी eKYC केली असतानाही ₹१५०० चा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लाडक्या बहिणींना eKYC बंधनकारक
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी eKYC करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून, या कालावधीत eKYC न केल्यास लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. याआधी ही मुदत १८ नोव्हेंबर होती, मात्र लाखो महिलांची eKYC प्रलंबित असल्याने सरकारने मुदत वाढवून दिली आहे.
eKYC करताना ही चूक पडू शकते महागात
eKYC करताना महिलांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
- आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर चुकीचा टाकल्यास OTP दुसऱ्याच नंबरवर जाऊ शकतो आणि eKYC अपूर्ण राहू शकते.
- ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांनी संबंधित आवश्यक कागदपत्रे महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे न दिल्यास eKYC पूर्ण मानली जाणार नाही.
कोणत्या महिलांना मिळणार नाही ₹१५००?
eKYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. eKYC पडताळणीदरम्यान ज्या महिला अपात्र ठरतील, पण तरीही आतापर्यंत लाभ घेतला असेल, अशा महिलांची नावे समोर येणार असून त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत.
त्यामुळे लाडक्या बहिणींनी eKYC करताना कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घ्यावी, अन्यथा ₹१५०० चा मासिक लाभ थांबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Comments are closed.