सरकारी रोजगार मेळावा मात्र ओसाडच राहिला !-Job Fair, But No Crowd!

Job Fair, But No Crowd!

हल्ली सरकारी नोकरीसाठी शिपायापासून ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या हजारो उमेदवारांनी अर्ज केलेत. पण नुकताच खडकीत झालेला सरकारी रोजगार मेळावा मात्र ओसाडच राहिला.

Job Fair, But No Crowd!२२ जुलै रोजी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं खडकीत मेळावा घेतला. तिथं १,४०८ रिक्त जागा भरणार होत्या, २६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या, पण फक्त १५२ उमेदवारच आले.

या १५२ पैकी फक्त ८७ जणांची प्राथमिक फेरीसाठी निवड झाली आणि शेवटी फक्त सात जणांचीच अंतिम निवड झाली!

दहावीपासून पदव्युत्तर आणि ITI झालेल्यांसाठी संधी होती. बँकिंग, इन्शुरन्स, सेवा आणि प्रॉडक्शन क्षेत्रातल्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

पण तरीही बेरोजगार तरुणांचा प्रतिसाद फारच कमी दिसून आला. हे पाहून, अधिकारी खासगीत म्हणाले, “आता सरकारी रोजगार मेळाव्यांना पूर्वीसारखा प्रतिसाद राहत नाहीय.”

Comments are closed.