देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसनं आपली तब्बल १८,००० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजना जाहीर केली हाय. ही योजना २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून पात्र भागधारकांना २६ नोव्हेंबरपर्यंत यात सहभागी होता येणार हाय.

कंपनीनं पुनर्खरेदीसाठी ₹१,८०० प्रतिशेअर इतकी किंमत ठरवली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २:११ प्रमाण ठेवण्यात आलं – म्हणजे तुमच्याकडं ११ समभाग असतील तर त्यापैकी २ समभाग कंपनी परत घेईल. मोठे संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी हे प्रमाण १७:७०६ असणार हाय.
इन्फोसिसनं या योजनेत पात्रता ठरवण्यासाठी १४ नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख ठेवली होती. ज्यांच्याकडे दोन लाखांपर्यंतचे समभाग असतील ते किरकोळ गुंतवणूकदार समजले जाणार. सेबीच्या नियमांनुसार कंपन्यांना या वर्गासाठी ठरावीक हिस्सा राखीव ठेवावाच लागतो. ही इन्फोसिसची २०२२ नंतरची पहिली बायबॅक योजना असून तब्बल दशकातली सर्वात मोठी आणि पाचवी पुनर्खरेदी योजना ठरणार हाय.
समभाग पुनर्खरेदीवरील करात बदल
पूर्वी गुंतवणूकदाराला बायबॅकवर कर भरावा लागत नाय. कंपन्यांनाच २० टक्के कर भरावा लागत होता. पण १ ऑक्टोबर २०२४ पासून नियम बदललेत. आता कंपनीकडून मिळालेली बायबॅकची रक्कम ही थेट लाभांश मानली जाईल. या रकमेवर गुंतवणूकदाराला त्याच्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागणार हाय. समभाग खरेदीचा खर्च वजा करता येणार नाय.

Comments are closed.