बारावीचा निकाल अखेर जाहीर! मुलींची बाजी, कोकण अव्वल, लातूर पुन्हा शेवटी! | HSC Result 2025: Girls Shine, Konkan Tops!

HSC Result 2025: Girls Shine, Konkan Tops!

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88% लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांवर मात केली आहे. मुलींचा निकाल तब्बल 94.58% इतका असून, मुलांचा निकाल 89.51% आहे.

HSC Result 2025: Girls Shine, Konkan Tops!

कोकण विभाग पुन्हा अव्वल, लातूर शेवटी
यंदाही निकालात कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. दरवर्षीप्रमाणेच विभागांमध्ये निकालाचे अंतर दिसून येते. निकालाच्या विश्लेषणातून असे दिसून येते की शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सरासरी निकाल कमी आहे.

१५ लाख विद्यार्थ्यांची मेहनत – निकालात थोडी घट
राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मागील वर्षीचा निकाल 93.37% होता, तर यंदा 91.88% इतका असल्यामुळे निकालात 1.49 टक्क्यांची घट झाली आहे. तरीही, विद्यार्थ्यांचा सरासरी प्रदर्शन समाधानकारक आहे.

निकाल पाहण्याची संकेतस्थळं – लगेच बघा आपला निकाल
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवरून आपला निकाल पाहता येणार आहे:

  • hscresult.mkcl.org
  • mahahsscboard.in
  • results.targetpublications.org

निकाल कसा पाहायचा? – सोपी पद्धत

  • अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • “HSC Examination Result 2025” लिंकवर क्लिक करा.
  • आपला सीट नंबर व आईचे पहिले नाव भरा.
  • “Submit” क्लिक करा.
  • आपला निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाऊनलोड करून प्रिंट घ्या.

परीक्षा व निकालाची वेळापत्रक ठरलेली होती
बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान झाल्या. या परीक्षेत ८.१० लाख मुले आणि ६.९४ लाख मुली सहभागी झाल्या. जवळपास दोन महिन्यांपासून निकालाबाबत उत्सुकता होती. अखेर ४ मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाले होते.

निकालाची वेळ – आज दुपारी १ वाजता ऑनलाइन उपलब्ध
शिक्षण मंडळाने निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता आपला निकाल पाहावा व भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. मार्कशीटची प्रिंट काढून पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी उपयोगात आणावी.

दहावी-बारावी निकाल यंदा लवकर – शिक्षणमंत्रींची माहिती खरी ठरली
यंदा परीक्षा नेहमीच्या तुलनेत १०-१५ दिवस लवकर पार पडल्या, त्यामुळे निकालही लवकर लागणार हे आधीच स्पष्ट झाले होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी १५ मेपूर्वी निकाल लागतील असे सांगितले होते. त्यानुसारच निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपवण्यात आली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
तुमचा निकाल तुमच्या मेहनतीचे प्रतिबिंब आहे. निकाल काहीही लागला तरी आत्मविश्वास ठेवा आणि पुढील टप्प्यांसाठी प्रयत्न करत रहा.

Leave A Reply

Your email address will not be published.