नाशिकच्या आळंदी धरण परिसरात आयोजित एकदिवसीय पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रा. योगेश सदावर्ते यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची भीती दूर करण्याचा सल्ला दिला. शारीरिक चाचणीत उत्तम कामगिरी करणारे अनेक विद्यार्थी लेखी परीक्षेत मागे पडतात, म्हणून नियमित अभ्यास, विषयांचे आकलन आणि स्मार्ट युक्त्या आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकी अभ्यासिकेत गिव्ह फाउंडेशनच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह या विषयांतील महत्त्वाच्या सूत्रांच्या आठवणी टिकून राहाव्यात यासाठी त्यांनी खास उपाय सांगितले.
धागूर, नवे धागूर, आळंदी धरण, दरी, गायची वाडी आणि रवळगाव येथील विद्यार्थी या मार्गदर्शनाचा लाभ घेत होते. मुंबई पोलिस दलातील दीपक लिलके यांनी योग्य मार्गदर्शन आणि मेहनत यांची सांगड घातली तर यश दूर नसते असा अनुभव सांगितला. शिबिराच्या आयोजनात किरण निंबेकर, संदीप पवार, अशोक हसनाळकर आदींचा सहभाग होता.

Comments are closed.