महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ‘APAAR आयडी’ नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पूर्णतः डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असून त्या ‘डिजिलॉकर’च्या माध्यमातून मिळतील.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी सुरक्षित, सुलभ आणि कायमस्वरूपी ठेवणे हा आहे. डिजिटल गुणपत्रिकांमुळे भविष्यातील प्रवेश प्रक्रिया, पात्रता तपासणी, शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.
राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची APAAR आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. केलेल्या नोंदणीचा तपशील राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करणे बंधनकारक असून, यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहेत.

Comments are closed.